दिशा सालियन व सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मोठा स्फोट!

₹2 लाख कोटींच्या नुकसानभरपाईच्या खटल्यावर ठाणे सिव्हिल कोर्टाचा आदेश
“आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती, आमिर खान आणि इतर प्रमुख व्यक्तींविरुद्धचा खटला आता बॉम्बे हायकोर्टात चालणार आहे.”
ठाणे सिव्हिल कोर्ट (सीनियर डिव्हिजन) यांनी दिलेल्या आदेशानुसार, ₹2 लाख कोटींच्या नुकसानभरपाईचा दावा आरोपींविरुद्ध बॉम्बे हायकोर्टाच्या ओरिजिनल साइडमध्ये दाखल करण्यात येत आहे.
ठाणे कोर्टाने हा खटला हायकोर्टात दाखल करण्यासाठी याचिकाकर्त्यांना एक महिन्याची मुदत दिली आहे.
यासोबतच, जोपर्यंत आरोपी न्यायालयात ही रक्कम भरत नाहीत, तोपर्यंत त्यांची संपत्ती जप्त करण्याची आणि अटक वॉरंट काढण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
हा दावा ५० उत्तरवाद्यांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये पुढील व्यक्तींचा समावेश आहे:
आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती, उद्धव ठाकरे, आमिर खान, निखिल कामत, सुभाष चंद्रा, संजय राऊत, अनिल देशमुख, अरविंद सावंत, राजदीप सरदेसाई, पूजा भट्ट, रोहन राय, सूरज पंचोली, डिनो मोरिया, अॅड. सतीश मानेशिंदे, दिया मिर्झा, शम्स ताहेर खान, सौ. सोनी राजदान, श्री इम्तियाज खत्री, निधी हिरानंदानी, तसेच बेननेट कोलमॅन अँड कंपनी लिमिटेड, इकॉनॉमिक्स टाईम्स, बीबीसी, इंडिया टुडे, इंडियन एक्सप्रेस, लाईव्ह लॉ, द हिंदू, TV9 मराठी, मिड-डे, न्यूज लॉन्ड्री यांसारख्या विविध मीडिया संस्थांचा समावेश आहे.
दिशा सालियन यांचे वडील श्री. सतीश सालीयन आणि श्री. रशीद खान पठाण यांनी त्यांच्या शपथपत्रात नमूद केले आहे की, वसूल होणाऱ्या ₹2 लाख कोटींपैकी 99% रक्कम अॅड. निलेश ओझा यांच्या सल्ल्यानुसार सामाजिक कार्यासाठी वापरण्यात येणार आहे.
हा खटला मागील अनेक दिवसांपासून पूर्णतः गोपनीय पद्धतीने न्यायप्रविष्ट होता. कोणतीही सार्वजनिक माहिती न देता न्यायालयात सुनावणी झाली आणि आता अखेर न्यायालयाने आदेश पारित केला आहे.
या आदेशाच्या आधारावर ₹2 लाख कोटींच्या नुकसानभरपाईसाठीचा खटला बॉम्बे हायकोर्टात दाखल करण्यात आला आहे. तसेच, जोपर्यंत आरोपी ही रक्कम भरत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर संपत्ती जप्ती व गैरजामिन अटकेची प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपींनी दिशा सालियन व सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूबाबत खोटे नैरेटिव्ह प्रसारित करून जनतेला दिशाभूल केली, तसेच दिशा सालियन यांचे वडील श्री. सतीश सालीयन, याचिकाकर्ते श्री. रशीद खान पठाण, अॅड. निलेश ओझा आणि त्यांच्या समर्थकांना बदनाम करण्याचा कट रचल्याचा CBI व NCB च्या अहवालांच्या आधारे पूर्णतः पर्दाफाश झाला आहे.
२३ जून २०२५ रोजी ठाणे कोर्टाने दिलेल्या आदेशात, हे नमूद करण्यात आले की, श्री. सतीश सालीयन हे मुंबईतील (दादर) रहिवासी असल्यामुळे हे प्रकरण मुंबई न्यायक्षेत्रात येते, व त्यामुळे ठाणे न्यायालयात हे प्रकरण चालवता येणार नाही.
नुकसानभरपाईची रक्कम खूप मोठी असल्यामुळे, याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. ईश्वरलाल अग्रवाल यांनी न्यायालयात स्पष्टपणे सांगितले की, हा खटला आता थेट बॉम्बे हायकोर्टाच्या ओरिजिनल साइडमध्ये दाखल केला जाईल.
अॅड. निलेश ओझा यांचे वक्तव्य:
“सुशांत सिंह राजपूत यांचा मृत्यू आत्महत्या नव्हे, तर एक पूर्वनियोजित हत्या आहे.”
CBI आणि NCB च्या दस्तावेजांतील गुप्त व निर्णायक पुराव्यांसह आरोपपत्राची प्रत ३ जुलैच्या सुमारास हायकोर्टात सादर केली जाईल आणि तीच प्रत जनता समोर देखील उघड केली जाईल.
या घडामोडींमुळे देशभरातील सुशांत व दिशा समर्थकांमध्ये न्यायासाठीची नवीन आशा जागी झाली आहे.
आता आरोपींसाठी उलटी गिनती सुरू झाली आहे.